Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan

Kartik Aaryan नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक त्याचे घरमालक होते याचा खुलासा केला आहे. कार्तिक आर्यननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही अभिनेता आणि त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी शेअर केली होती. 

'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan

Kartik Aaryan Post After Satish Kaushik Death : बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे 8 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता. त्यांच्या चाहत्यांनापासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननं (Kartik Aaryan) शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये कार्तिक आर्यननं सतीश कौशिक यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत "एक अप्रतिम अभिनेता आणि तितकेच अप्रतिम व्यक्ती आणि सगळ्यात चांगले घरमालक, मी जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आणि विनोद नेहमीच लक्षात राहतील सर. तुमच्या आत्माला शांती लाभो सतीश सर." (Kartik Aaryan Post After Satish Kaushik Death)

fallbacks

कार्तिकनं याविषयी 2019 शाली Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसाविषयी सांगितले होते. त्यात कार्तिक म्हणाला होता की "आठवड्यातून 3-4 वेळा ऑडिशनसाठी 6 तास प्रवास करायचो. बऱ्याचवेळा मला स्टुडिओच्या बाहेरून नकार दिला जायचा. त्याचं कारण म्हणजे मी त्या भूमिकेसाठी त्यांना जसा मुलगा अपेक्षित आहे तसा मी नव्हतो. पण मला नेहमी आशा होती. त्यानंतर मला काही सेकंदांच्या जाहिरातीतील भूमिका मिळू लागल्या आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर मी अंधेरीत एक घर भाड्यानं घेतलं या फ्लॅटमध्ये आम्ही 12 मुलं एकत्र राहत होतो. त्यावेळी माझ्याकडे जास्त पैसे देखील नव्हते." 

हेही वाचा : Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट

पुढे कार्तिक म्हणाला, "दोन की अडीच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर, मी जे स्वप्न पाहिलं की असं होऊ शकतं ते आज सत्यात उतरलं आहे. प्यार का पंचनामा या चित्रपटानंतर मला काही काम मिळतं नव्हतं. मग त्यावेळी मी त्याच फ्लॅटमध्ये मला तिसरा चित्रपट मिळे पर्यंत त्या 12 मुलांसोबत राहत होतो!

Read More