Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाशी लग्नानंतरही रणवीरसाठी अनुष्का 'स्पेशल'

अनुष्का आणि रणवीर सिंह या जोडीनं २०१० साली आलेल्या 'बँड, बाजा, बारात' या सिनेमातून एन्ट्री घेतली

दीपिकाशी लग्नानंतरही रणवीरसाठी अनुष्का 'स्पेशल'

मुंबई : २०१८ हे वर्ष अभिनेता रणवीर सिंहनं चांगलंच गाजवलं. बॉलिवूडमध्ये तो सध्या सर्वात 'प्रॉमिसिंग अॅक्टर' आहे. नोव्हेंबरमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोणसोबत झालेल्या विवाहामुळेही रणवीर चर्चेत राहिला. दीपिकासाठी त्याचं प्रेम काही लपून राहिलेलं नाही परंतु, करिअरच्या सुरुवातीच्या काळात रणवीर दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता... ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा... आणि महत्त्वाचं म्हणजे दीपिकाशी लग्नानंतरही अनुष्का आपल्यासाठी अजूनही खास असल्याचं नुकतंच रणवीरनं एका मुलाखतीत म्हटलंय. अनुष्काचं माझ्या लग्नात येणं खूपच स्पेशल होतं, असं रणवीरनं म्हटलं.

अनुष्का आणि रणवीर सिंह या जोडीनं २०१० साली आलेल्या 'बँड, बाजा, बारात' या सिनेमातून एन्ट्री घेतली. ही जोडी त्या वर्षीची सर्वात हिट जोडी ठरली... आणि सोबतच सुरू झाली या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. दोघांनी एकमेकांना काही काळ डेटही केलं. परंतु, त्यांचं नातं काही दीर्घकाळ टीकू शकलं नाही. 

अनुष्का शर्मा डिसेंबर २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकली तर नोव्हेंबर २०१८ मध्ये दीपिकासोबत रणवीर सिंहनंही आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. 

fallbacks

रणवीर - दीपिकाच्या मुंबईमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडची गर्दी पाहायला मिळाली... या गर्दीमध्ये अनुष्काही दाखल झाली होती. याचाच रणवीरला आनंद आहे. म्हणूनच अनुष्काचं माझ्या लग्नाला उपस्थित राहणं खूपच खास होतं आणि हे तिचं खूपच सुंदर गेस्चर होतं, असं रणवीरनं म्हटलंय.

२०१३ मध्ये एका मुलाखतीत रणवीरनं अनुष्कासोबत बिनसल्याचं मान्य केलं होतं. आपल्याला तिची खूप आठवण येत असल्याचंही त्यानं म्हटलं होतं. अनुष्काबद्दल बोलताना तो म्हणाला, 'ती खूपच गोड आहे. अनेकदा लोकांना लोक तिला समजू शकत नाही. लोकांना हे समजतंच नाही ते कुठून आलीय आणि व्यक्ती म्हणून कशी आहे'. त्यानंतर २०१५ साली आलेल्या 'दिल धडकने दो' या झोया अख्तरच्या सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. 

Read More