Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गाव गाता गजाली' घेतेय प्रेक्षकांचा निरोप

कोकणातील सौंदर्य, तेथील माणसे, कोकणी माणसांचा अतरंगी स्वभाव यावर आधारित गाव गाता गजाली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.

'गाव गाता गजाली' घेतेय प्रेक्षकांचा निरोप

मुंबई : कोकणातील सौंदर्य, तेथील माणसे, कोकणी माणसांचा अतरंगी स्वभाव यावर आधारित गाव गाता गजाली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.

गप्पा मारणे याला कोकणात गजाली असं म्हणतात. कोकणातील याच गजाली सांगणारी ही मालिका काही महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यातील अनेक पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. प्रत्य़ेक पात्राची एक खासियत आहे.

अथर्व थिएटर्सची ही निर्मिती आहे. राजू सावंत यांनी ही मालिका दिग्दर्शित केलीये. तर प्रल्हाद कुडतरकरची कथा आहे. 

ग्रहण ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होतेय. याआधीही कोकणातील रात्रीस खेळ चाले ही मालिका झी मराठीवर आली होती. 

Read More