Marathi News> मनोरंजन
Advertisement

DUS KA DUM : पहिल्याच एपिसोडमध्ये सलमान खानला थेट स्पर्धकाने विचारला 'हा' प्रश्न

अभिनेता सलमान खान 'दस का दम' हा रिएलिटी शो घेऊन पुन्हा हिंदी टेलिव्हिजनवर आला आहे.

DUS KA DUM : पहिल्याच एपिसोडमध्ये सलमान खानला थेट स्पर्धकाने विचारला 'हा'  प्रश्न

मुंबई : अभिनेता सलमान खान 'दस का दम' हा रिएलिटी शो घेऊन पुन्हा हिंदी टेलिव्हिजनवर आला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा या शोचं सलमान खानने सूत्रसंचलन केले होते. त्यानंतर आता या शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे.  

पहिला एपिसोड टेलिकास्ट 

सलमान खानच्या 'दस का  दम'च्या दुसर्‍या सीझनलादेखील चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद दिला आहे. या रिएलिटी शोमध्ये काही गंतमीदार प्रश्नांची उत्तर काही टक्क्यांमध्ये द्यायची असतात. हे खास प्रश्न आणि सलमान खानची सूत्रसंचलनाची हटके स्टाईल याचे त्याचे चाहते दीवाने आहेत. 

सलमान खानला स्पर्धकाने विचारला खास प्रश्न 

शो मध्ये सलमान खान प्रश्न विचारत असला तरीही पहिल्याच एपिसोडमध्ये स्पर्धकाने थेट त्याला प्रश्न विचारला. खेळाचा भाग म्हणून जेव्हा ' किती % भारतीय असे आहेत ज्यांच्यावर प्राण्यांमुळे पळण्याची वेळ आली आहे' असा प्रश्न होता. हे ऐकून स्पर्धक आणि प्रेक्षक  हसले आणि त्या स्पर्धकाने सलमानवर अशी कधी वेळ आली आहे का ? असा उलट प्रश्न केला. त्यावर  सलमान खानही हसून म्हणाला.'   अजूनही पळवतच आहे यार...'   

 

चाहते या उत्तराचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी लावत आहेत. 

बिग बॉस 12 ची प्रतिक्षा 

बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाचेही सूत्रसंचनल सलमान खानने केले आहे. लवकरच बिग बॉसचेही 12 वे पर्व होणार आहे. येत्या 15 जूनला सलमान खानचा 'रेस 3' रीलीज होणार आहे. तसेच लवकरच सलमान 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात करणार आहे. 

Read More