Marathi News> मनोरंजन
Advertisement

'विश्वास करणाऱ्याची फसवणूक करु नका...'; धर्मेंद्र यांची पोस्ट पाहताच नेटकरी म्हणाला, 'पहिल्या बायकोला...'

Dharmendra Cryptic Post Netizen Ask About Personal Life : धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यानं विचारला त्यांच्याच खासगी आयुष्यावर प्रश्न...

'विश्वास  करणाऱ्याची फसवणूक करु नका...'; धर्मेंद्र यांची पोस्ट पाहताच नेटकरी म्हणाला, 'पहिल्या बायकोला...'

Dharmendra Cryptic Post Netizen Ask About Personal Life : लोकप्रिय बॉलिवूड दिग्गज अभिनेता धर्मेंद्र सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असायचे. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सनी देओलनं देखील एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याचं वडील म्हणजेच धर्मेंद्र यांना चाहत्यांच्या संपर्कात रहायला आवडतं. त्यामुळे ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. दरम्यान, धर्मेंद्र यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. इतकंच नाही तर धर्मेंद्र यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांची चिंता वाटू लागली आहे. 

धर्मेंद्र यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर आणि आताचा X अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन दिलं की 'जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते त्यांना धोका देऊ नका विनंती आहे.' त्यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की नक्की धर्मेंद्र यांनी असं का लिहिलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हे योग्य बोलत आहेच असं सांगितलं तर काहींनी ठीक आहात ना असं विचारलं. 

एक नेटकरी धर्मेंद्र यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, 'तुम्ही अगदी योग्य बोलत आहात.' दुसरी म्हणाला, 'तुम्ही योग्य बोलतायत सर, पण कोणाला धोका का द्यायचा?' तर एका नेटकऱ्यानं त्यांच्या खासगी आयुष्यावर कमेंट केली. तो म्हणाला, 'मग तुम्ही तुमच्या पहिल्या पत्नीला धोका का दिला धरम पाजी.... कधी कधी आपल्याला हे आयुष्य फसवणूक करत असल्याचा विचार न करता वाहून जाण्यास भाग पाडते.'

हेही वाचा : स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमांस... नवरा ज्याला बायकोचं स्वप्न करायचंय पूर्ण! Mr And Mrs Mahi ट्रेलर प्रदर्शित

धर्मेंद्र यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना 4 मुलं होते. पण 1980 मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी धर्म बदलून लग्न केलं आणि त्यांना दोन मुली आहेत. त्यात ईशा देओलचा नुकताच घटस्फोट झाला. तिच्या पतीवर धोका देण्याचा आरोप आहे. त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' मध्ये दिसले आहेत. तर लवकरच ते 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. 

Read More