Marathi News> मनोरंजन
Advertisement

रिऍलिटी शोच्या मंचावर अभिनेत्रीचा संताप; तिने असंकाही केलं की....

ही तिच्या कारकिर्दीची नवी इनिंग आहे. 

रिऍलिटी शोच्या मंचावर अभिनेत्रीचा संताप; तिने असंकाही केलं की....

मुंबई : रिऍलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गावजवणारे कलाकार अनेकांच्या स्मरणात आहेत. याच रिऍलिटी शोंमुळे आजवर अनेक बड्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीतील एका नव्या टप्प्याची सुरुवात करण्याचीही संधी मिळाली आहे. अशाच कार्यक्रमांच्या यादीतील एक नाव म्हणजे 'नच बलिये'. डान्स रिऍलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची पहिल्या पर्वापासून बरीच चर्चा होती. आता 'नच...'च्या ९व्या पर्वानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. 

छोट्या पडद्यावर चांगल्याच चर्चेत असणाऱ्या या कार्यक्रमात सध्या सूत्रधार आणि परीक्षकांमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात परीक्षकपदी असणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडन आणि सूत्रधार असणाऱ्या मनीष पॉल यांच्यात काही मतभेद झाले, ज्यामुळे चक्क कार्यक्रमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार रवीनाने इयर फोन्स लावले होते, ज्या माध्यमातून तिला व्यासपीठामागून काही सुचना देण्यात येत होत्या. त्याचवेळी मनीष काहीतरी करत असल्याचं पाहून रवीना त्याच्यावर भडकली. तो आपल्याला वेडावून दाखवण्यासाठी म्हणून असं करत असल्याचं तिला वाटलं. पुढे कॅमेरा बंद होताच ती मनीषवर भडकली आणि आपण बोलत असताना कृपया मनीषने असं वागू नये अशी ताकिद त्याला दिली. रवीनाच्या या अशा वागण्याने मनीषचाही राग अनावर झाला. आपण फक्त आपल्याला देण्यात आलेलं काम करत असल्याचं त्याने सांगितलं. 

मनीषचं हे बोलणं ऐकून पुन्हा रवीनाला राग आला आणि तिने माईक फेकत सेट सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मनीष त्यानंतर काही वेळ सेटवर थांबला होता, पण तोसुद्धा काही वेळाने सेटवरुन निघून गेला. ज्यानंतर निर्मिती संस्थेच्या मंडळींनी या दोघांचीही मनधरणी करत त्यांना सेटवर परत आणण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर पुढे साधारण तासाभरानंतर ते दोघं सेटवर आले आणि पुढील चित्रीकरणास सुरुवात झाली. 

Read More