Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच विराटची अनुष्काविषयी तक्रार, पण...

सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी. 

VIDEO : लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच विराटची अनुष्काविषयी तक्रार, पण...

मुंबई : कला आणि क्रीडा विश्व, विशेषत: क्रीकेट विश्व हे फार आधीपासून चालत आलेलं एक अफलातून समीकरण आहे. मुख्य म्हणजे या नात्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला अशा या सुरेख नात्यात चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी जवळपास वर्षभरापूर्वीच लग्नगाठ बांधली. काही दिवसांनीच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण, त्याधीच या दोघांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अर्थात हे खटके म्हणजे खरीखुरी भांडणं नसून प्रेमाने त्यांच्यात होणारा संवाद आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये त्यांच्या नात्याची ही सुरेख बाजू पाहायला मिळत आहे. 

लग्नाच्या आधी आपल्याला विराटने कोणती वचनं दिली आणि त्यांची खरंच पूर्तता केली का, याविषयी ती लग्नासाठी सज्ज असणाऱ्या एका वधूला सांगत आहे. 

तर, विराटही नवऱ्या मुलाला लग्न झाल्यानंतरची परिस्थिती सांगत आहे. त्यांच्यामधील हा संवाद आहे, 'मान्यवर' या कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठीचा. 

मुख्य म्हणजे कितीही खटके उडाले, मतभेद झाले, वळ पडल्यास वचनांची पूर्तताही नाही झाली, तरीही एकमेकांची साथ कधीच न सोडण्याचा सुरेख संदेश या जाहिरातीतून विरुष्का देत आहेत. 

अनेकांच्याच मनात या जाहिरातीने घर केलं असून, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानेही विराट खरंच खूप चांगला अभिनेता असल्याचं ट्विट करत म्हटलं आहे. 

Read More