Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवशी भारतीला घ्यावा लागला कठोर निर्णय; डोळ्यांतील पाणी थांबता थांबेना

आता मुलगा 12 दिवसांचा होताच भारतीला अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला.

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवशी भारतीला घ्यावा लागला कठोर निर्णय; डोळ्यांतील पाणी थांबता थांबेना

मुंबई : विनोदवीरांच्या गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करत मोठा संघर्ष करत प्रसिद्धीझोतातत आलेलं एक नाव म्हणजे कॉमेडियन भारती सिंग. गरोदरपणाच्या काळात प्रसूतीचे दिवस नजीक येईपर्यंत भारती तिच्या कामाशी एकनिष्ठ राहिली. मुलाच्या जन्मानंतर तिच्यावर असंख्य शुभेच्छांचा वर्षावही झाला. ज्यानंतर आता मुलगा 12 दिवसांचा होताच भारतीला अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला. (Bharati Singh)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं तिच्या या निर्णयाची माहिती सर्वांनाच झाली. कामाप्रती दिलेल्या शब्दाखातर तिला मनावर दगड ठेवून मुलाला सोडून चित्रीकरणासाठी यावं लागलं.

‘मी आज खुप रडलेय. 12 दिवसांचं बाळ आहे, पण काम काम असतं. मी कामाप्रती असणाऱ्या काही जबाबदाऱ्या आणि माझा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आले आहे’, असं ती म्हणाली. छायाचित्रकारांनी अतिशय दिलखुलासपणे तिच्या मुलगा झाल्याच्या आनंदात मिठाईची मागणी करताच पुढच्या वेळी ही मागणी नक्की पूर्ण करेन असं म्हटलं.

मुलाला जन्म दिल्यानंतर आलेल्या बाळाचं कोडकौतुक करणारे अनेकजण असतात. पण, त्याचवेळी मुलाला पाठीशी ठेवून त्याच्याच भविष्यासाठी मोठ्या धीरानं घराबाहेर पडणाऱ्या या आईचंही कौतुक होणं गरजेचं आहे नाही का ?

Read More