Marathi News> मनोरंजन
Advertisement

शेवटी रणवीरनं दीपिकाला रडवलंच...; नात्यात हे कोणतं वळण?

रणवीर आणि दीपिकानं एकमेकांना घडताना पाहिलं. 

शेवटी रणवीरनं दीपिकाला रडवलंच...; नात्यात हे कोणतं वळण?

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह म्हणजे बॉलिवूडमधील एक मोस्ट हॅपनिंग कपल. जवळपास 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दीपिका आणि रणवीरनं लग्नाचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात एका सोहळ्यात या जोडीनं लग्नगाठ बांधली आणि नव्या प्रवासाची सुरुवात केली. 

रणवीर आणि दीपिकानं एकमेकांना घडताना पाहिलं. यश-अपयशाच्या प्रत्येक वळणावर या दोघांनीही एकमेकांना साथ दिली. ज्यानंतर आता म्हणे रणवीरमुळंच दीपिला रडू अनावर झालं. 

दीपिका आणि रणवीरमध्ये असं काय झालं, रणवीरनं नेमकं काय केलं की दीपिकाला रडणं थांबवणंही कठीण झालं, असेच प्रश्न चाहत्यांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली. 

दीपिकाचे अश्रू अनावर होण्याचं कारण होतं रणवीरचा नवा चित्रपट '`83'. 

एका मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शकानं म्हणजेच कबीरस खान यानं याबाबतचा खुलासा केला. 

रणवीरची मध्यवर्ती भूमिका असणारा हा चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाच्या भावनांचा बांध फुटला. तिनं त्यानंतर लगेचच कबीरला फोन केला होता. 

फोन उचलल्यानंतर दीपिकाचा आवाजच येईना. ज्यानंतर तिनं चुकून फोन केलाय का, किंवा तो चुकून लागला आहे का असंच त्याला वाटलं. 

पण, तितक्यातच दीपिका बोलली...., 'सो सॉरी... मी जरा जास्तच भावनिक झाले, भारावलेय खरं सांगावं तर. मला धड बोलताही येत नाहीये.'

दीपिकाची ही अवस्था पाहून, अगं तुला काहीच बोलायची गरज नाही. तुला जे सांगायचं होतं ते तू एकाच ओळीत सांगितलं आहेस असं कबीर तिला म्हणाला. 

पतीसोबत चित्रपचात एकत्र झळकलेल्या दीपिकानं दिलेली ही प्रतिक्रिया कबीरच्या दिग्दर्शनाला मिळालेली शाबासकीचीच थाप होती. 

24 डिसेंबरला '`83' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा भाषांमध्ये हा चित्रपट विविधभाषी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More