मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जवानांवर फेब्रुवारीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. बॉलिवूड कलाकारांनी १५ ऑगस्टपूर्वी पुलवामा शहीदांना खास अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान, टाइगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूर शहीद जवानांना ट्रिब्यूट देण्यासाठी एकत्र आले आहेत.
बॉलिवूड कलाकारांनी मिळून पुलवामा शहीदांना देशभक्तीपर 'तू देश मेरा' हे गाणं समर्पित केलं आहे. स्वातंत्र्यदिवसाच्या एक दिवस आधी सीआरपीएफने ट्विटरवर या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे.
Official Poster of the Tribute Song for #CRPF Martyrs of Pulwama #TuDeshMera by @HAPPYPRODINDIA
—CRPF (@crpfindia) August 14, 2019
Bollywood comes together to pay homage to the Pulwama Martyrs of #CRPF
Thanks @SrBachchan @iamsrk @aamir_khan @TheAaryanKartik @iTIGERSHROFF #Ranbirkapoor #AishwaryaRai pic.twitter.com/OPLrNfz8Ia
या खास गाण्यासाठी जावेद अली, जुबीन नौटियाल, शबाब साबरी आणि कबीर सिंह यांनी आवाज दिला आहे.