Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' जोडीच्या Breakup नं बॉलिवूडला हादरा; लग्नाच्या चर्चांमध्येच दुराव्याचं वादळ

ही जोडी म्हणजे Made for each other... असंच त्यांनापाहून चाहते म्हणत होते. 

'या' जोडीच्या Breakup नं बॉलिवूडला हादरा; लग्नाच्या चर्चांमध्येच दुराव्याचं वादळ

मुंबई : प्रेम करणं जितकं सोपं, त्याहूनही ते निभावणं जास्त कठीण. आजवर आपण प्रेमात आकंठ बुडालेली आणि ते विभावणारी अनेक जोडपी पाहिली असतील. एका सेलिब्रिटी जोडीकडे पाहूनही चाहत्यांना असंच वाटत होतं. (Bollywood)

ही जोडी म्हणजे Made for each other... असंच त्यांनापाहून चाहते म्हणत होते. कुटुंबातील कार्यक्रम म्हणू नका किंवा मग एखादी सुट्टी आपल्या खास व्यक्तीसोबत घालवणं म्हणू नका. 

ही जोडी कायमच एकमेकांच्या सोबतीनं दिसत होती. आपण आता सिंगल नसल्याचं म्हणत ही जोडी अनेकदा एकत्रच दिसू लागली होती. पण, आता मात्र हे चित्र बदललं आहे. 

कारण या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आता मीठाचा खडा पडल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या महितीनुसार अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता इशान खट्टर यांनी त्यांच्या 3 वर्षांच्या रिलेशनशिपवर पूर्णविराम लावला आहे. (annaya panday ishan khattar break up)

दोघांनीही परस्पर सामंजस्यानं या नात्यात इथंच थांबण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणत त्यांचं मैत्रीचं नातं कायम राहणार आहे अशी माहिती दोघांशीही संलग्न असणाऱ्या व्यक्तीकडून मिळत आहे.

'खाली पिली' या चित्रपटातून त्यांच्यातली जवळीक वाढली आणि आता मात्र या नात्याच ब्रेकअपचं वादळ आलं. पण, येत्या काळात एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर आल्यास तो चित्रपट साकारण्याची दोघांनीही तयारी दाखवली आहे. 

सध्या त्यांच्यातील मैत्रीत सारंकाही आलबेल आहे. गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन काहीसा वेगळा असल्याचं दोघांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी समजुतदारपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

fallbacks

महत्त्वाची बाब अशी, की साधारण महिन्याभरापूर्वीच इशान आणि अनन्याचं गोड नातं शाहिद कपूरच्या बर्थडे पार्टीत पाहायला मिळालं होतं. त्यामुळं त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीनं पूर्ण बॉलिवूडला हादरा बसला आहे. 

काहींनी तर एकिकडे या जोडीच्या लग्नाच्या चर्चा सुरू केलेल्या असतानाच त्यांच्या कानावर ही बातमी पडल्यामुळं अनेकांना धक्काच बसला आहे. 

Read More