Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून घटस्फोटानंतर हृतिकने सुझानसाठी लिहिला भावूक संदेश

२०१३ मध्येच हृतिक आणि सुझान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

...म्हणून घटस्फोटानंतर हृतिकने सुझानसाठी लिहिला भावूक संदेश

मुंबई : नाती ही एखाद्या काचेच्या वस्तूइतकी नातूक असतात. एकदा या नात्यांना तडा गेला की पुन्हा ती पूर्वपदावर आणणं निव्वळ अशक्यच होऊन जातं. कलाविश्वात याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. सध्या नात्यांविषयीच्या या चर्चा होण्याचं कारण म्हणजे अभिनेता हृतिक रोशन याने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट. 

हृतिकने सुझान खान म्हणजेच त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा एक फोटो, व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यासोबतच ही माझी पूर्वाश्रमीची पत्नी आणि सध्याची खूप चांगली मैत्रीण असंही त्याने इथे स्पष्ट केलं आहे. 

सुझान, हृतिक आणि त्यांची दोन्ही मुलं रेहान आणि रिदान सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहेत. मुख्य म्हणजे घटस्फोटानंतरही सुझानने हृतिकच्या कुटुंबाशी असणारं नातं आणि खुद्द हृतिकसोबतची मैत्री कायम ठेवली आहे. 

विभक्त होऊनही मुलांसाठी एकत्र येणं सहज शक्य आहे, हा विचार त्याने आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. हृतिक आणि सुझान या दोघांमध्ये असणारं हे मैत्रीपूर्ण नातं अनेकांसाठी नात्यांची परिभाषा बदलणारं ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

२०१३ मध्येच हृतिक आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर जवळपास वर्शभरानंतर त्यांचा घटस्फोट झाला. १४ वर्षांचं वैवाहिक नातं स्पवत या दोघांनीही आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण, आपल्या मुलांसाठी त्यांनी आजही मैत्रीचं नातं कायम ठेवलं आहे. 

 

Read More