Marathi News> मनोरंजन
Advertisement

....तरीही विवाहसंस्थेवर माझा विश्वास - अर्जुन कपूर

अर्जुन लग्नाविषयीसुद्धा तितक्याच आत्मियतेने बोलतो. 

....तरीही विवाहसंस्थेवर माझा विश्वास - अर्जुन कपूर

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची अधिकृतपणे ग्वाही दिली. विविध कार्ययक्रमांनासुद्धा आता ही बहुचर्चित सेलिब्रिटी जोडी एकत्र हजेरी लावत आहे. मुख्य म्हणजे मलायकासोबतच्या नात्याविषयी खुलेपणाने बोलणारा अर्जुन लग्नाविषयीसुद्धा तितक्याच आत्मियतेने बोलतो. 

आपल्या रिलेशनशिपला माध्यमांनीही अगदी सकारात्मकपणे सर्वांपर्यंत पोहोचवत एक प्रकारे या नात्याविषयी आदरच व्यक्त केला, असं म्हणत त्याने माध्यमांचेही आभार मानले. असा हा अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या लग्नाविषयीचे विचारही तितक्याच खुलेपणाने मांडतो. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विचार मांडले. 

सध्याच्या घडीला तरी विवाहबंधनात अडकण्यात आपल्याला रस नसल्याचं त्याने स्पषअट केलं आहे. तर, विवाहसंस्थेविषयी त्याने एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. आपल्या आई- वडिलांच्या अपयशी नात्याचा संदर्भ देत त्याने हे वक्तव्य केलं. 'मी जरीही एका दुभंगलेल्या नात्याला पाहिलं असलं तरीही माझा विवाहसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी अतिशय आनंदात असणारी अशी अनेक जोडपी आजूबाजूला पाहतो', असं तो म्हणाला. पण, यातही अतिउत्साही पणा चांगला नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. आय़ुष्याच्या वळणावर या गोष्टी ओघाओघाने घजाव्यात असा विचार त्याने मांडला. नात्यात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत चढ-उतारांना तोंड देत नंतरच या गोष्टी तुम्हाला कोणत्या वळणावर नेऊन सोडतात हे पाहा... असं विधान त्याने केलं. 

नात्याविषयी अर्जुनचे हे विचार पाहता मलायकालाही त्याचा अभिमानच वाटेलल. दरम्यान, अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. सोबतच आपल्या व्यग्र वेळापत्रकातून तो मलायकासोबतही वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहे.  

 

Read More