Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुझ्या पत्नीने दोन लग्न केले तर? 'या' स्पर्धकाने अरमान मलिकला दाखवला आरसा, म्हणाली...

Sana makbul confront Armaan Malik : प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या असतात, असं वक्तव्य अरमान मलिकने केलं होतं. त्यावर आता बिग बॉसमधील एका कंटेस्टेंटने अरमानला सडेतोड उत्तर दिलंय.

तुझ्या पत्नीने दोन लग्न केले तर? 'या' स्पर्धकाने अरमान मलिकला दाखवला आरसा, म्हणाली...

Sana makbul Angry on Armaan Malik : बिग बॉस ओटीटीच्या नव्या सिझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) आपल्या दोन पत्नींसोबत आला आहे. अरमान मलिक हा 'बिग बॉस ओटीटी 3' शोचा स्पर्धक असल्याने आता कंटेस्टेंटमधील स्पर्धा अधिकच वाढली आहे. अशातच, प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या असतात, असं वक्तव्य अरमान मलिकने केलं होतं. त्यावर आता अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री सना मकबूलने अरमान मलिकला खडे बोल सुनावले आहेत. सना मकबूल अरमान मलिकला असा प्रश्न विचारला की, ज्याची कदाचित यूट्यूबरला अपेक्षाही नसेल.

झालं असं की, सना आणि अरमान मलिक आपल्या इतर मित्रांबरोबर घरात बसून बोलत असतात. त्यावेळी, सनाने अरमानला फैलावर घेतलं. समज जर ज्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत. आता चित्र थोडं उलटं कर.. जर पायलने अचानक एखाद्या पुरुषाला तिच्यासोबत घरी आणलं तर तुला ते ठीक वाटेल का? असा सवाल सनाने अरमानला विचारला. सनाचा प्रश्न ऐकून अरमानला देखील धक्का बसला. ती घरात आणून ठेवणार? असा उलट प्रश्न अरमानने केला. त्यावर सनाने होकारार्थी मान हलवली.

सनाच्या प्रश्नावर अरमान थोडा गोंधळात पडला. त्यावर त्याने उत्तर देणं टाळलं. पायलने ते स्वीकारले आहे, मी नाही... विषय संपला, असं अरमान म्हणतो. तिला मान्य नसेल तर तू पुन्हा लग्न करणार नाहीस का? असा प्रश्न सना विचारते. तेव्हा पायलने लग्न करून कुणाला आणलं असतं तर भाऊ, तू तुझ्या घरात सुखी असशील, मी आनंदी असेल, असं उत्तर अरमानने दिलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Armaan Malik काय म्हणाला होता?

दीपक चौरसियाशी बोलत असताना अरमान मलिकनं सांगितलं की 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या असतात.' आता त्याच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. तर एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत देवोलीनानं एक मोठी पोस्ट लिहिली आहे. व्हिडीओमध्ये ती हे बोलताना दिसतेय की 'हा माणूस काय बोलतोय.' तिच्या पोस्टमध्ये देवोलिना बोलते की 'प्रत्येक माणसाला दोन बायका नको, फक्त ज्या लोकांची वाईट वृत्ती असते त्यांना एकापेक्षा जास्त पत्नी हव्या असतात. हे बंद कर. एखाद्या दिवशी जर त्याच पत्नी बोलू लागल्या की त्यांना देखील प्रत्येकीला दोन नवरे हवे आहेत. मग ते बघायला देखील तयार रहा.' 

Read More