Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC च्या मंचावर घडलं की Amitabh Bachchan यांना अश्रू अनावर, Video Viral

जाणून घ्या, अमिताभ बच्चन यांना का झाले अश्रू अनावर...

KBC च्या मंचावर घडलं की Amitabh Bachchan यांना अश्रू अनावर, Video Viral

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) 'कौन बनेगा करोडपती' चे गेल्या 22 वर्षांपासून सुत्रसंचालन करत आहेत. अमिताभ यांच्याशिवाय करोडपती पाहणं कदाचित सगळ्यांसाठी अवघड आहे. स्पर्धकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच केबीसी आणि अमिताभ बच्चन यांना वर्षानुवर्षे असेच बघायचे आहेत. अशा परिस्थितीत केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन ढसाढसा रडायला लागले तर ते त्यांच्या चाहत्यांना अजिबात आवडत नाही. KBC च्या मंचावर असं काय झालं की अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले हे जाणून घेऊया...

केबीसीच्या आतापर्यंतच्या प्रवासात अमिताभ बच्चन यांच्या सगळ्या बाजू पाहायला मिळाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन स्टेजवर एकदा खूप भावूक झाले होते. अमिताभ यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. कॅमेऱ्यासमोर ते खूप रडू लागले. वास्तविक, KBC चे 1000 एपिसोड्स पूर्ण झाले होते, ज्यावर अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली खास पाहुण्या म्हणून आल्या होत्या. इतकंच नाही तर बिग बींच्या पत्नी जया बच्चनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शोशी जोडल्या गेल्या होत्या. (amitabh bachchan cried on kaun banega crorepati set kbc new season jaya and shweta bachchan) 

केबीसीच्या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलीने केबीसीच्या प्रवासाविषयी विचारले असता, बिग बींनी हा शो करण्यास कसे तयार झाले ते सांगितले. ही संपूर्ण स्टोरी सांगताना त्यांनी शोची सुरुवात आणि 22 वर्षांचा प्रवास सांगितला. यानंतर शोमध्ये केबीसीचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे, जो पाहून अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात पाणी येते. व्हिडिओ संपल्यानंतर प्रेक्षकांमधील सर्व लोक उभे राहतात आणि टाळ्या वाजवू लागतात. हीच वेळ होती जेव्हा अमिताभ बच्चन यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ते रडू लागले.

Read More