Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून बिग बींची कपिलच्या पार्टीला गैरहजेरी

दोन महिन्यांपूर्वी दिला होता शब्द 

...म्हणून बिग बींची कपिलच्या पार्टीला गैरहजेरी

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून आपलं लग्न आणि ऑनएअर जाणाऱ्या नव्या शोबद्दल चर्चेत आहे. कपिल शर्माने खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गिन्नी चतरथसोबत लग्न केलं आहे. 

कपिल - गिन्नीने मुंबईत बॉलिवूड ते अगदी टीव्ही कलाकारांपर्यंत सगळेच या रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते. पण आतापर्यंत सगळ्यांच्या लग्नांना उपस्थित असणारे महानायक बिग बी मात्र या लग्नाला गैरहजर राहिले. 

दो महिन्यापूर्वी केला होता वादा 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दोन महिन्यांपूर्वीच लग्नाला येण्याचा वादा केला होता. अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर कपिल शर्मा आला होता. त्यावेळी कपिलने बिग बी यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आणि अमिताभ यांनी देखील स्विकारलं होतं. 

 

fallbacks

नॅशनल टीव्हीवर केलं होतं प्रॉमिस 

यावेळी कपिल शर्माने अमिताभ बच्चन यांना सांगितलं होतं की, सर तुम्ही नॅशनल टीव्हीवर आणि सगळ्या प्रेक्षकांसमोर शब्द देत आहे. तेव्हा बिग बी देखील म्हणाले होते की, आता बोललो आहे तर नक्की येणार. 

का तोडला शब्द 

असं नाही की अमिताभ बच्चन यांनी कोणत्याही गोष्टीमुळे आपला शब्द पाळला आहे. पण बॉलिवूडचे शहनशाह बिग बी यांचं बिझी शेड्युल कुणापासून लपलेलं नाही. 

कॉमेडिअन कपिल शर्माने 12 डिसेंबर रोजी गिन्नी चतरथसोबत जालंधरमध्ये अगदी हिंदू पद्धतीने लग्न केलं. सोमवारी कपिल शर्मा आणि गिन्नीने बॉलिवूड कलाकारांना रिसेप्शन पार्टी दिली. कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या प्रत्येक कलाकाराने यावेळी स्वागतसोहळ्यात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ पाहता रणवीर आणि दीपिकानेच खऱ्या अर्थाने कल्ला केल्याचं म्हणायला हरकत नाही.

रिसेप्शनच्या तारखेसंबंधी देखील तसंच काहीसं झालं. अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना या रिसेप्शनला उपस्थित राहता आलं नाही. 

Read More