Marathi News> मनोरंजन
Advertisement

बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये

Aishwarya India's Richest Actress : एकीकडे बच्चन कुटुंबात वादाची चर्चा तर दुसरीकडे ऐश्वर्या राय ठरली भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री

बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये

Aishwarya India's Richest Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री आहे. काही वर्षांमध्ये ऐश्वर्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिच्या चित्रपट आणि प्रोजेक्टशिवाय ती अनेक ब्रॅंड्सचा फेस आहे. त्यासोबत ती सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री देखील ठरली आहे. चला तर पाहुया कोण आहे या लिस्टमध्ये...

'सियासत' च्या शेअरच्या नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत ठरली आहे. तिच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत. त्यामुळे ऐश्वर्याची एकून नेटवर्थ ही 800 कोटी आहे. तिच्यानंतर या यादीत प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, करीना कपूर, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर आणि नयनतारा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही नेटकरी रेडिटवर त्या लिस्टचा फोटो शेअर करत आहेत. हे फोटो शेअर करत त्यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की बच्चन कुटूंबासोबत असलेल्या वादात ऐश्वर्यानं एक नवीन रेकॉर्ड केला आहे. या आधी रेडिटवर एका नेटकऱ्यानं एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ऐश्वर्याचं दुबई ऑफ-शोर अकाऊंट असल्याचं म्हटलं जातं होतं. हे एक बिझनेस, एएमआईसी पार्टनर्स लिमिटेडशी जोडलेलं आहे. हे अकाऊंट 2009 मध्ये बंद करण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये पुढे दाखवण्यात आलं की कंपनीत ऐश्वर्याशिवाय आणखी तीन आणि लोक आहेत. ज्यात तिची आई वृंदा राय आणि तिचा भाऊ आदित्य राय यांची नावं आहे. दरम्यान, असे म्हटले जाते की ऐश्वर्याचं अॅम्टरडॅममध्ये एबीएन एमरो बॅंक अकाऊंट आहे. त्यात देखील तिचे खूप पैसे ठेवले आहेत. मात्र, व्हिडीओ कितपत खरा आहे यावर देखील वेगळा वाद सुरु आहे. पण काही काळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

हेही वाचा : 'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी

बच्चन कुटुंबाच्या कथित वादात सगळीकडे चर्चा सुरु असताना. 'टाइम्स नाउ' च्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ऐश्वर्या आणि अभिषेकच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या आहेत. पण ते फक्त त्यांची मुलगी आराध्यामुळे एकत्र राहत आहेत. एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबाचं राहत घर जलसा देखील सोडलं आणि ती तिचा पती म्हणजेच अभिषेक बच्चन आणि लेक आराध्यासोबत वेगळी राहते. तर जया बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्याचं पटत नाही. इतकंच नाही तर जया बच्चन आणि ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाही आहेत. त्यामुळे ते वेगळे राहत आहेत. 

Read More