Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलिष्काच्या पाठोपाठा 'या' मराठी कलाकारांनी बनवलं खड्यांवर गाणं

पाहा हे गाणं 

मलिष्काच्या पाठोपाठा 'या' मराठी कलाकारांनी बनवलं खड्यांवर गाणं

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, मुंबईकरांना खड्यांच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अगदी चाळण होते. अशावेळी प्रवास करणे हे अतिशय खडतर असतो. अशावेळी सरकार आणि महानगरपालिकेकडून कायमच प्रवाशांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जातो. अशावेळी कलाकार मंडळी आपल्या पद्धतीने मुंबईकरांची ही व्यथा मांडत असतात. 

दोन दिवसापूर्वी आर जे मलिष्काचं खड्यांवरील गाणं व्हायरल झालं. या पाठोपाठ आता मराठी कलाकार देखील उतरले आहे. निर्माते - दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि स्मिता शेवळे आणि ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे देखील या व्हिडिओत आहे. या खड्यावर शतदा प्रेम करावे असे ही कविता केली असून खड्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांना आवडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मुंबईच्या रस्त्यांची अवस्था सध्या खूप बेकार आहे. दरवर्षी पावसात मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो. पण महानगरपालिका यावर काहीच तोडगा काढत नाही. अशावेळी कलाकारांनी अशा पद्धतीने आपली मतं मांडायला सुरूवात केली आहे. 

Read More