Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: लग्न करायंच, मुलं हवी आहेत... कधी पूर्ण होणार 'या' वादग्रस्त अभिनेत्रीच्या संसाराच्या आकांक्षा

Kangana Ranaut on Marriage: अभिनेत्री या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मोकळेपणानं बोलताना दिसतात. तर काही जणी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार काहीच बोलताना दिसत नाहीत. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि वादग्रस्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. 

VIDEO: लग्न करायंच, मुलं हवी आहेत... कधी पूर्ण होणार 'या' वादग्रस्त अभिनेत्रीच्या संसाराच्या आकांक्षा

Kangana Ranaut on Marriage: कलाकार हे आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना दिसतात तर काही हे आपल्या खाजगी गोष्टी आपल्यातच ठेवतात. अभिनेत्री ज्या अजूनही लग्न करायच्या बाकी आहेत त्यांनीही नानातऱ्हेचे प्रश्न हे विचारले जातात. आपण लग्न कधी करणार? तुमच्या अपेक्षा काय आहेत? तुम्हाला कसा नवरा हवा? लग्नाबद्दलचे काय प्लॅन्स आहेत? वैगेरे वैगेरे असे नाना तऱ्हेचे प्रश्न त्यांना विचारले जातात. त्यावर काही जणी या लाजत उत्तर देतात तर काही मात्र या प्रश्नाचं उत्तर टाळतात. परंतु त्यांच्या चाहत्यांना ही कायमच उत्सुकता असते की आपल्या लग्नाच्या अपेक्षांबद्दल त्यांची मतं काय आहेत. सध्या अशाच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला असाच एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याबद्दल तिनं मजेशीर अन् गजब उत्तर दिलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री ही चांगलीच चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री कंगना राणावत ही. आपल्या परखड व्यक्तिमत्त्वासाठी कंगना ओळखली जाते. कंंगनाच्या डेटिंगच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. ती प्रेमातही पडली परंतु अद्यापही ती सिंगल आहे. त्यामुळे एका चित्रपट प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान तिला आपल्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे आणि त्यावर कंगना आपलं मतं व्यक्त केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंगना ही बॉलिवूडच्या नेपोटिझमवर बिनधास्तपणे बोलताना दिसते आहे. त्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यामुळे तिची सारखीच चर्चा ही रंगलेली असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

हेही वाचा - मराठमोळ्या अभिनेत्यानं घेतलं उज्जैन येथील महाकाल अन् काल भैरवनाथचं दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला...

सध्या कंगना आपल्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती आणि नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. बुधवारी एएनआयला झालेल्या एका मुलाखतीत तिनं याविषयीचा खुलासा केला आहे. यावर तिला असाच एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली की, प्रत्येक गोष्टीची एक वेळ येतेच आणि जर माझ्या जीवनात जर का अशी वेळ येणार असेल तर नक्की येईन. मलाही लग्न करायचे आहे आणि स्वत:चा परिवारही हवा आहे. पण हे सगळं योग्य वेळी होईलच. 

कंगनाचा 'एमरजन्सी' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचसोबतच ती 'चंद्रमुखी 2' मध्येही दिसणार आहे. सध्या कंगना सोशल मीडियावरही सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांनी अपडेट ठेवते आहे. 

Read More